Posts

Showing posts from June, 2020
Image
★★★जंत्रीतलं ग्यान★★★ [भाग-चार] बासरी वाजवायची लहानपनापसून आवड हैं. आत्ता सिकायलं बासरी हाती घेतली ती पन स्वतः बनव्लेली. बासरी शिकू लाग्लो त्त कळ्तंय की, आय्कायलं जित्कं गोड वाटतंय तित्कं हे वाद्य सोप्पं नाही. आधी 'दमधीरसास' राखून ठेवाव. फुक अन बोटानं बासरीच्या दाबऱ्या काठोकाठ बंद कराव या दोन खुब्या आल्या पाह्यजे. ही खुबी आली की, फुक एकसारखी ठेवत ज्यो सूर वाजव्ला जातोय, त्योच सूर ढंगानं वाजवत ठेवनं त्याच्याहून आव्घड काम हाये हे समजाय्लं लाग्लं. फुक पिच धरून ठेवणं अन दाबऱ्या काठोकाठ बंद करुन ठेवणं जमलं की खरोखाट अप्ली बासरी तंतोतंत बसली की नाही हे समजतं ? निशिदीन रियाज केलं की, हे सगळं उमगून येत राह्यतं. कधी कधी त्त फुक अन दाबऱ्या यातलं आंतर, सूर, व्येग, लै कळली की, नांद झुळुकेसारखा लईत तग धरून बहरतो. बासरीची ठेवन कशी हैं यावर बासरीचा बाज ठरत आस्तो. बासरीच्या लांबीरुंद्या ह्या सुरात सुरावळ वळवीत राह्यतात. बासरीची आखंड गोलाई गोडवा आनत कानालं तित्कीच काळजालं पल्हाळधुंद करते. काळजातून इच्यार येतात. बासरी होटावर धर्ली की, "फुंक मारताना बासरीच्या म...
Image
★★★जंत्रीतलं ग्यान★★★ [भाग-तीन] पाय्पाचा तुकडा हातात हाय. आता या पाय्पाची बासरी तयार कराय्ची हाय. बासरी वाजाय्लं गोड अन सुरात निपजाय्ची आसल त्त मुखरी आधी कोरून घ्याव लाग्ती. जिथून होट काठावर थांबून स्वासाची हाल्कीच फुक लाव्तात. ही फुक दमदार अन वाहती आस्ती. म्हून सूर आचळ अन काठोकाठ भर्लेला ऐकू यतो. पहिल्या सुरेबिना मुखरी कोरून घेतली की, आरंकळी, मधले बोट, अन चाफेकळी हे तीन डाव्व्या हाताच्या अन तसेच उज्व्या हाताच्या दाबऱ्या कोराव लाग्तात. आधी मुखरी काहून कोराव? तुम्ही सगळे सहजगत्या प्रश्नाच्या जंज्वाळात पडसाल, की ही मुखरी, दाबऱ्या, त्याचे येगयेगळे नावं कस्सेक्काय हायेत? हेप्पा सोप्पं हैं...जिथं तोंड थांबून होटानं फुक पहिल्या कोराळीत फुकली ते ठिकाण, ते तोंडाकडंचं पहिलं सिद्र्र म्हंजे मुखरी. अन जिथं डाव्व्या उज्व्या हाताचे तीन तीन बोटं अंगठा अन करंगळू सोडून कोराळीवर काठोकाठ दाबलेले आस्तात ती सगळी कोराळीची ठिकाणं म्हंजे दाबऱ्या. मुखरीलंं मुखरंध्र पन म्हंतात. ह्या दाबऱ्यांना शास्त्रीय संगीतात नावं हैतं. कोन्ही त्यालं "धैवत, निषाद आणि षड्ज, रिषभ, गंधार आणि मध...
Image
★★★जंत्रीतलं ग्यान★★★             [भाग-दोन] बार्दान्यातल्या निवडक वस्तूंकडं महं ध्यान गेलं. आडवा पडलेला ढवळाबक्क पाय्पाचा तुकडा नदरत भर्ला. एखांदी चीजवस्तू नदरत पडली की, ती उपेगी येती हे कारागिरालं आक्षी ध्यानात बसतं. म्या लगेच बोललो, "व्हईल ह्याची बासरी व्हईल हो बा!" "कर मंग...त्यात उशीर काहून कराव.चांगला इच्यार डोस्क्यात आला की, लगेच त्यालं सत्यात उतराव.उशीर करू नाही!"बा म्हणले. "हं...!" म्या हुंकार सोडला. पाय्पाचा तुकडा हाती घेऊन न्याहाळलं. बाक तपासून घेतला. नदरेनंच लांबी रुंदी मोजली.पाय्पाची गोलाई टळटळ होती. गोलाईचा नांद घुमेर राह्यतो. गोलाई आवाजात वळणं आणून गोडाई साधते. पन लगेच प्रश्न पडला की, "याचा मापगुण्या घ्याव लागल. आंतर जोखून टाकू. अन आंतर कश्यानं मोजाव? "मापनी हैं का?" लांबीरुंद्या हाब्कवू. फुक बसवावी लागल. "फुक कशी ठेवाव?" "चुच काढाव लागल. चुच तासायल निपरी हैं का?" "ती कोन्त्या डब्यात ठेवली आसल?" या इच्यारात एक इच्यार गवसला. पिच बसली की, नांद धुमार फुटत चालतो. सूर लईत निंघ्तो. आवाजाच...
Image
★★★जंत्रीतलं ग्यान★★★ [भाग-एक] हं तर बार्दाना म्हंजे क्काय? असा प्रश्न पडला आसल तुम्हालं. बार्दाना म्हंजे प्रयोगाचं सामानसुमान. नाना वस्तूचीजांनी भरलेलं साहित्य. सुईपसून त्त नाड्यापर्यंत अन सोनलईपसून लोखंडपर्यंत, रबरापसून त्त चिनीमातीच्या खापरापर्यंत, पलास्टिकच्या वस्तूपसून त्त जर्मलच्या चीजांचं सामानसुमान. बिघाडबाघाडीचं अन उखळापाखळीचं साहित्य. तोडफोडीचं अन जोडाजाडीचं सामानसुमान हैं त्यात. कित्ती क्काय क्काय सांगू तुम्हालं? घरात उजेडाचं ठिकाण ते मही प्रयोगशाळाच. उजेड नस्ला की बार्दान्यातली आग्या मव्हळाचं मेन गाळून तयार केलेली घरेलू मेनबत्ती पेटवाय्ची त्या उजेडात प्रयोगाचं बस्तान. ह्या प्रयोगाचं बस्तान बसलं की, ना भूक लागत ना तहान. ना कोन्ती चिंता ना वखवख. ना वेदनेच्या जानीवा. कैकक्काळ मांडी घालून प्रयोग जोडतजाडत बसलं की, पायपोट्रीच्या शिरादोरा पिळून निंघ्तात, त्या शिरेतून लव निघून तारं गरम होतात. पन प्रयोगावरचं ध्यान हटत नाही. काल सहज बा म्हणले, या पाईपची बासरी करता येईल. मजबूत हैं. म्या म्हणलो,"कोन्त्या?" या तुह्या बार्दान्यातल्या पाईपाची. बा बोट ब...
Image
★★★सामाजिक न्याय्य भूमिकेतील नाव-राजर्षी शाहू★★★ "जो समाज जागृत असतो आपल्या प्रगतीच्या वाटेवर असतो परिवर्तनशील असतो त्या समाजाने वरच जास्त अन्याय-अत्याचार होऊन करून त्याला प्रगती पासून दूर कसे जाता येईल त्याच्या जागृत पणाचे लक्षण कसे नष्ट होईल या अर्थी त्याला अज्ञानात ढकलले जातात त्याला बेरोजगार केले जाते त्याला त्या समाजाला गुलाम म्हणून जगवले जात असे या समाजावर आजही अन्याय अत्याचार होतो आहेत की नाही हे तपासणे गरजेचे आहे" देशात अनेक राजे होऊन गेले. संस्थांनेही झाली. समाजाचं स्वत्वं गेलं होतं ते स्वत्वं जागे करुन समाजाला संघटित करुन, राज्य प्रस्थापित करण्याची कामगिरी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. हातात आलेलं राज्य समाजातील शोषित, पीडित, वंचित घटकांना उभे करण्यासाठी वापरायचे हे सूत्र ठेवून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा राज्य कारभार केला. दत्तक विधानानंतर पहिल्या दिवसापासूनच हे राज्य लोकांसाठी चालवण्याचा निर्णय घेतला. प्रशासनात शिस्तीची भूमिका घेतली. अनेक निर्णय घेतले. अधिकार हातात असताना शेवटच्या माणसाविषयी हृदयात करुणा होती. उपे...
Image
***Authorship ***                                           "Authorship is itself a very responsible morality. What is the place of the writer in the world of tropics in the world? What is the author who is not only a resident of all the states but also a strict medical practitioner of all the states, and who makes himself uncomfortable or distressing himself? What is its location in the existence of people? What is the relationship between the society's overall value system and its conflict? Authorship is a serious matter of its own. The authors themselves are an unassuming constitution. He stands on one of the welfare points of all. He does not write for himself. He writes for gross He writes the beauty of the gross welfare. That is why writing for all this is written for himself. Sakaltha is his only selfishness. He uses his words, but in those words the world has its meaning...