Posts

Showing posts from March, 2020
Image
श्रुती - स्मृतींचे राजमार्ग : मराठी दलित काव्य अनिकेत जावरे यांच्या लेखातील काही मुद्दे - जातीव्यवहार म्हणजे लोकांच्या शारीरिक व्यवहाराचे नियमन, कारण जातीव्यवहार स्पर्श प्रकारच्या व्यवस्थेतून व्यक्त होतो. ज्याप्रमाणे मानवी शरीरे 'जाती'च्या संकल्पनेद्वारे बांधली गेली, त्याचप्रमाणे दलित काव्याची ऊर्जा आणि ताकद 'अस्सल' दलितत्वात बांधली गेली. अस्सलपणाच्या संकल्पनेच्या आधारे अस्सल परिघावर राहून अस्सल आपल्यावर अस्सल अन्याय झाला आहे, याचे अस्सल नैतिक समाधान मिळते. 'बुर्ज्वा' शिक्षण दलित व्यक्तीत विषमतेचा प्रदेश सोडून आर्थिक सुस्थितीत स्वतः ला सापडण्याची कामना उत्पन्न करते. दलित साहित्याचा आत्मा इथे हरवला! कुणी काढला? दलित काव्याचा उपभोग बहुतकरून न-दलित वाचक करतात. त्यांच्याबरोबर एका ताटात जेवण्यापेक्षा, आपली कन्या त्यांना लग्नात देण्यापेक्षा दलित साहित्याचा उपभोग घेणे सोपे ठरते. शब्द कितीही जवळचे वाटले तरी, साहित्यातले शब्द एकत्र जेवण्याइतके किंवा शरीरसंबंध जोडण्याइतके जवळचे नसतात..... वर्षानुवर्षे शोषल्या गेलेल्या, या सर्व निम्नवर्णी, कुपोषित लोकांचे सुंदर ...
Image
★★★"मुन","नवरोझ"अन "पत्रकारिता"★★★                          "नव - रोझ" इराणच्या नव्या वर्षाचा दिस... ती सर्व बंधने झुगारून प्रज्ञेसाठी भारतात आली. मून उसका नाम.इराण सें भारतीय पत्रकारिता के खोज में पुणे स्थित हुवी.काही काळातच सर्वांना तिने समजून घेत आपलं अस्तित्व निर्माण केलं ..नव्या भूगोलक्त ती पत्रकारितेचा अभ्यास करतेय... २५ मार्च  तिच्या मायभूचा नव्या वर्षाचा दिस ...तिने इराणी मुफ्ता अन गुलाब देत सर्वांना शुभेच्छा दिल्यात......" "बेस्ट ऑफ लक ऑफ द इयर - मून....." "मैत्रीत कुठे ऐतिहासिक,सामाजिक,राजकीय,धार्मिक, भाषिक, भौगोलिक,सांस्कृतिक,सीमारेषा असतात का...?" "बोलो तुम ही?"                             इराणचा इतिहास हा स्त्री जीवन व त्यादृष्टीने तितका मोकळा नाही.परंतु बदलत्या परिप्रेक्षात तेथील जनजीवणाच्या जाणिवाही बदलत आहेत.मुली शिकू लागल्या आहेत.इव्हन परदेशवारी करून शिकत आहेत.मुन त्यातली एक.ती मराठी बरीच शब्दशब्दाने शिकली आहे.इथला व्यवहार ती ...
Image
★★★नाट्य-समीक्षा★★★ "फिडलर ऑन दि रुफ"- "बिकट वाट वहिवाट" एक-सांगितिक नाटक सत्तरीच्या दशकातील हे नाटक अनुवादित करून व्यकंटेश  माडगूळकर यांनी मराठी साहित्यात आणलं  आहे. याचवेळी त्यांनी पॅरिसला असतांना फिडलरचा फ्रेंच भाषेतील प्रयोग पहिला होता.आणि भारतातील मोगलाईचा काळ हैदराबाद संस्थानच्या विलीनीकरण प्रक्रियेतील सामाजिक घुटमळ मनात उभी राहिली.त्यावर लिहावं आणि या पद्धतीत बसवावे असे त्यांनी ठरविले. आणि नंतर "बिकट वाट वहिवाट" लिहायला घेतले. संस्थानच्या सरहद्दीवरील गावे खेडी उठवून त्याजागी पठाण,अरबांची वस्ती करावी असा एक डाव होता. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग इंडियन नॅशनल थिएटर ने 19 ऑक्टॉबर 1976 ला रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे केलेला होता. "बिकट वाट वहिवाट" प्रास्ताविक- समाजाची परंपरा आणि चालीरीती,नातेसंबंध व विचारधारणेचा हा काळ मोगलाईच्या अस्तनीत जगणाऱ्या जनतेचा काळ आहे.अजून एकोणीसशे अठ्ठेचाळीस साल सुरू आहे. वडिलोपार्जित धन व सम्पती,आणि लालसा, सर्वसामान्य धारणा घेऊन जगणारा हा समाज आहे.जगात बदल घडत आहेत.पण त्याच्या या जनतेच्या जगण्यावर प...
स्मरण शंकरभाऊंचे...! -----------------------------   साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे धाकटे बंधू शाहीर शंकर भाऊ साठे यांचा आज २४ वा स्मृतिदिन. व्यवस्थेविरुद्ध लढत लढत वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी आजच्याच दिवशी १५ मार्च १९९६ रोजी आपल्या मायभूमीत सांगली जिल्ह्यातील वाटेगावात अखेरचा श्वास घेतला होता. २६ आॅक्टोबर १९२५ रोजी वालुआई आणि भाऊराव सिद्धोजी साठे यांच्या पोटी शंकरभाऊंचा जन्म झाला. त्यांचे आजोबा सिद्धोजी राघोजी साठे ( १८४८- १८९९) हे मुंबईचे प्रसिद्ध बांधकाम कंत्राटदार होते. स्वकष्टावर त्यांनी टाकवे गावात ५४ एकर शेतजमीन खरेदी केली होती. सिद्धोजी यांना भाऊराव हा एकुलता एक मुलगा होता. सिद्धोजी यांच्या अकाली मृत्यूमुळे भाऊरावांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान इंग्रज सरकारने मांग जातसमूहाला कायद्याने गुन्हेगार घोषित करून तीन वेळची हजेरी लावली. मांगांची धरपकड सुरू केली. पकडलेल्या मांगांना तारेच्या कुंपणात (डिटेंशन सेंटर ) बंदी बनवले जात होते. अशातच इंग्रजांचा हस्तक असलेल्या टाकवे गावच्या शेतकर्‍याने भाऊरावांच्या शेतजमिनीवर बळजोरीने कब्जा केला. त्याच्या ताब्यातून आपली शेती सोडवून घ...
Image
★★★कुंगाबाई शाहू - प्रेरणेची पाखरमया★★★ "कुठं भिजला का नाही भिजला खोसला लंगोटा पुढं निंघला तीन बोटाचा लंगोट घालून चालला रे तू तोंड वासून म्या पुसतो तुला आता काय राहिलं तुह्या मांघं आता ?"                            आजाराने पुंजाबा नेमकाच मेला व्हता. त्याचं मढं बांधतांना सगळ्यांनी पाह्यलं. जगण्यामरण्यातला संघर्ष तिनं पाह्यला. तिनं सगळं आयुष्य स्वाभिमानी जग्लं. उर्लेलं जगत हाये. "निंदन - खुर्पनं केले. सुग्या - सरया केल्या. हैब्रीडं सोंग्ले, पाडले, बांध्ले, सुड्या रच्ल्या, दाने पाटलाच्या घरात घात्ले." "भाकर तुकडा मिळाला नाही तव्हा रानभाज्या पिळून-चुरगाळून खाल्ल्या माय!" "जीवावर बेतलेले कामं केले पन; सबुद कोन्हाचा लावून घेत्ला नाही." ती म्हणते, "गड्या, "जबान चांग्ली पाह्यजे त्याच्यावर ह्यो ख्योळ हैं सग्ळा!" "सिरबड - बिरबड काट्यांनं कुंपन करून घेत्लं परांतु आप्ल्या जीव्नालं काटीकुपाटी नाही तू घरालं काटीकुपाटी का लाव्तू?" "खळं होईल रे सग्ळं!"                   ...
Image
***नेमाडेंच्या लेखणीतला शुक्राणू***                                "रंगमंच्याच्या गर्भार गोटातून  नेमाडेंच्या लेखणीतला शुक्राणू वळवळत मेंदूत घुसला पांडुरंग सांगवीकर होऊन.सुन्न झालेला बुळबुळीत मेंदू सांगवीकराने चेंदून टाकला देखणी सोबत."                                "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र आयोजित ललितोत्सव दोन दिवसांपासून नामदेव सभागृहात सुरु आहे.काल "कंनुप्रिया" या हिंदी काव्यखंडावर प्रयोग झाला.आज नेमाडेंड्या "मी पांडुरंग सांगवीकर"आणि "देखणी" या साहित्यावर प्रयोग झाला.दोन्ही दिवसाचे प्रयोग मेंदू चेंदून गेले.ठसा उमटला त्यो नेमाडेंड्या साहित्याचा.बोराडीला अध्यापकीय प्रशिक्षण घेत असतांना हूल,देखणी,कोसला,बिढार,तुकाराम,वाचलं.तर पुण्यात आल्यावर नेमाडे अख्खे भेटले वाचायला.पुण्यात झुल,जरीला, मेलडी हिंदू:जगण्याची समृद्ध अडगळ भावून गेलं. "रंगमंच्यावरचा सांगवीकर पहायला हवा....!" असं कोणतरी ...