★★★"डॉ. गेल ऑम्व्हेट आता नाहीत...".★★★ सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिक्षण घेत असतांना डॉ. गेल यांचे विचार ऐकता आले, समजता आले यार्थी वैविध्यपूर्ण विषयावरील त्यांचं स्वतःचं मत आणि संशोधन यातील सहसंबंध जाणून घेता आले. काही वर्षांपूर्वी पुण्यात "मुक्ता साळवे साहित्यविचार संमेलन" झाले होते. या साहित्यविचार संमेलनात डॉ. गेल यांचं भाषण झालं होतं. ते सविस्तरपणे विश्लेषित करतांना त्यांनी 'भारतीय संविधानिक मूल्यतत्व आणि सामाजिक- साहित्यिक चळवळींची मीमांसा' अत्यंत परखडपणे आणि तितकीच आशयसुदृढ पद्धतीने केल्याचं आजही मनावर ठसलेलं आहे. डॉ. गेल यांनी देश , जात, प्रांत, भाषा, लिंग, रंग, आणि गुलामीच्या शृंखला तोडत आपलं अस्तित्व जागतिक पातळीवर बिंबवलं. आज त्या नाहीत...पण विचार आहेत... त्यांच्याविषयी अजूनही सचिनजी यांच्या वॉलवरून... आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ,...