“लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी | जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी" सुरेश भटांनी लिहिलेल्या ह्या गीताची आठवण प्रत्येक मराठी भाषादिनाला झाल्या वाचून राहत नाही. कोणताही साहित्य प्रकार निर्माण होताना त्यामध्ये तेथील समाजाचे प्रतिबिंब हे पडत असते. त्याचप्रमाणे हे गीत लिहिताना देखील आजूबाजूची परिस्थिती, समाजाचा कल लक्षात घेऊनच भटांनी याची रचना केलेली असावी. २०व्या शतकात ही कविता लिहित असतानाचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र यामध्ये बराच बदल झालेला आपल्याला दिसून येतो. तेव्हा आपण मराठी बोलतो याची लाज कोणाला वाटत नसे पण आज २०१८ मध्ये मात्र आपल्याला यामध्ये फरक पडलेला दिसतो. पूर्वी फक्त उच्च जातीतल्या माणसांना संस्कृत येत आणि सामान्य माणसांना मराठी येत. संस्कृत मधील साहित्य सर्वसामान्यांना सम...