Posts

Showing posts from December, 2022
Image
 "महाराष्ट्राच्या काळजाचं रक्त ओरबडणारी धमनी - समृद्धी महामार्ग!" - विश्वनाथ साठे सहज एक प्रश्न काळजाला चाटतो आहे. ही समृद्धी नेमकी कुणाची? रस्ते की शोषणाचे राजरोस महामार्ग जाळे? विदर्भ हा नैसर्गिक खनिजांचा साठा असलेला प्रदेश म्हणजे चलनवलनाची खाणच. सर्व कच्च्यापक्क्या भौतिक - मानवी - प्राणी - पशु (नैसर्गिक) मालमत्तेचा लूटप्रवाह यापूर्वीही आणि आता तर सहापदरी महामार्गाने राजरोस होतो आहे.                   महाराष्ट्रात अशी आडवी रेष का ओढली भांडवलशाही वर्गव्यवस्थेने? वास्तविक पाहता ९७ टक्के इतकी  खनिजसंपत्ती विदर्भात असून उर्वरित ३ टक्के कोकणकडे आहे. या संपत्तीत कोळसा, डोलोमाईट क्रोमाइट, बेराईट, कायनाईट व सिलीमनाईट बॉक्साईट, चुनखडी, मॅगनीज, लोहखनिज आदींचा समावेश आहे. भारतीय खनिज संपत्ती सर्वेक्षणानुसार ६ हजार ९५६ दशलक्ष टन खनिजांचे साठे विदर्भात आहेत. पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात हे मोठे साठे आहेत. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त १२.३३% क्षेत्रफळात खनिजसंपत्ती सापडते. तस...
Image
 "रित्या ओंजळीत माझ्या" - प्रा. पैलवान  "नव्या उत्तर आधुनिक स्त्रीवादाचा नवा आवाज!"  प्रा. पैलवान यांना विविध पुरस्कार आणि सत्कार झालेले आहेत. विविध संस्थांच्या संयोजक - नेतृत्व आणि दि लीडरशिप ऑफ सोशलिजमकरिता खंबीर नेतृत्व राहिलेल्या आहेत. त्यांचा "तुझी माझी मैत्रवेल" हा दीर्घ काव्यसंग्र प्रकाशित झालेला आहे. तासगाव तालुका महिला दक्षता समिती सदस्य म्हणून त्यांची निवड आहे. हा सगळं सामाजिक - साहित्यिक व्यवहार सुरू असताना त्यांनी जो संवेदनशीलतेचा दर्शनी भाग आपल्या साहित्यामध्ये समाजाचे बदलते शास्त्र म्हणून ठेवताना पारदर्शक पद्धतीने ठेवलेला आहे. ही त्यांची वेगळी भूमिका साहित्यात - साहित्य व्यवहारात आणि सामाजिक नीती मूल्यांच्या संकल्पना रुजवण्यामध्ये अत्यंत मोलाची ठरणार आहे. म्हणून त्यांची अभिव्यक्ती ही केवळ एका व्यक्तीपूरती न राहता ती सामाजिक होते. तिचे संदर्भ हे वैश्विक जीवन जाणिवेला ग्रासत आधार देतात.                     अभिव्यक्ती ही मानवी मनाची नितांत गरज असण्याच्या काळामध्ये पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये एका स्त्रीने पुरु...
Image
  "तुझी माझी मैत्रवेल" - प्रा. पैलवान  # “सामाजिक मूल्यभान जगविणारी संहिता!”                     प्रा. पैलवान यांनी "तुझी माझी मैत्रवेल" हा जो काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानंतर जी काव्यसंहिता वाचक - रसिक - समीक्षक आणि प्रकाशन क्षेत्रात आली यामुळे मैत्री या वैश्विक संज्ञाला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी या क्षेत्राला येणार आहे. ही दीर्घ काव्यसंहिता आहे आणि या दीर्घ काव्यसहितेतून केवळ मैत्रीवर बोलताना प्रा. पैलवान यांनी जो आशय दिला आहे आणि सामाजिक स्तराला वैश्विक स्तराचे अनुबंध जोडले आहे त्यामध्ये खूप मोठी ताकद आहे.  साहित्याच्या वळणावळणावर आलेली वेगळी मर्यादा ही कविता थोडक्यात सांगते. एक असं वाक्य आले आहे की-  "मित्र आयुष्याचा  एक वळणावर  अनेक वादळ येतील आणि निघूनही जातील  त्या वादळात अखेरपर्यंत टिकून राहायचं आहे तुला"  ही आत्मभानाची जाणीव वाचकांसमोर ठेवताना स्वतःचे आत्मभान आणि मित्राला आत्मभान दर्शवण्याचा सहसंबंध येथे सामाजिक दृष्टिकोनचा स्पर्श प्रस्तुत कवितेतून ...