"तथागत समजून घेतांना..."
जीवणी- "आपल्यात हे असं सतत युद्ध का होतं? कोणतं तत्व जगतो आपण दोघेही? कळव नं तुझ्या शब्दांत!"
जीव- "जगाचा इतिहास जाणला तर युद्ध ही संज्ञा सजीवांच्या एकत्रीकरणाला भेद पाडणारी आहे. वैश्विक मानव समूहाचे सहजीवनच नष्ट करणारे युद्ध इथे झाली आहेत. आणि होतीलही. आपण सज्ञान सजीव आहोत. जीवतत्वाने एक आहोत. जरी टोकाचेबिनटोकाचे वाद असतील नसतील तरीही आपल्या दोघांतील हे युद्ध एकत्र येण्याकरिता आहे, परिवर्तनीय सहजीवन जगण्याकरिता आहे, भेदासहित दुरावा नष्ट करण्याकरिता आहे! व्यवस्थेने निर्माण केलेल्या अत्याचाराच्या विरोधातील महात्म्यांच्या सारतत्वाचे हे जगणे आहे. यात शोषण नसेल, अन्याय्य नसेल, भेद नसतील, दंडकशाही नसेल, दुराभाव नसेल, दुष्टता नसतील आणि असे युद्ध मोलाचे आहे. असे युद्ध इतिहासातही नाही. कारण आपल्या युद्धाच्या मुळातील तत्व हे तथागतांचे तत्व आहे. जगाप्रति या अफाट सजीव विश्वाप्रति तथागतांनी तत्व योजिले होते ते आहे. म्हणून हे युद्ध तत्वनिष्ठ असं सप्रमाण आहे.
-विश्वा

Comments
Post a Comment