"इतिहास लेखनाच्या धारणा व इतिहास....?"
मराठवाडा मुक्ती संग्राम हा लेख अतिशय बोलक्या भाषेने मांडला आहे.
तो इतिहास आहे .आणि एका जुलमी राजवटीच्या विरोधाचे ते जाज्वल्य असे प्रतीक आहे.
खरे इतिहास पाहता तो समूहाचा असतो .आणि तो अश्या संग्रामाच्या स्पस्टतेचा असेल तर त्यात प्रत्येक लढाऊ वृत्तीच्या आणि त्या रणसंग्रामात उतरलेल्या माणसाचा ठरतो.हेही तितकेच इतिहासाच्यादृष्टीने सापेक्षतेचे व समानत्वचे आहे.त्यामध्ये इतिहास लेखकाराने एका पठडीतूनइतिहास लेखन करणे जरुरी आहे का?संग्रामाच्या अंगाने विचार केला तर तो तळागाळातल्या लोकांपासून ते त्या संग्रामाच्या सर्वोसर्वा धुरीण नेत्या-वक्त्या व धोरणे ठरूवून ते अंमबजावणीच्या ध्येयाने कार्य करणाऱ्या प्रत्येकाचा आहे.हेही जाणकारांनी लेखनात उधृत करावे.कारण जेव्हढी जबाबदारी नेतृत्व करणारी जोखमीची असते तेव्हढीच जोखीम त्या संग्रामात लढणाऱ्या जीवांची असते.ते असतात त्या संग्रामाच्या शिलेदार.
इतिहास लेखन करताना ह्या बाबीचे महत्व लक्षात घेणे गरजेचे आहे.कि,आपण इतिहास हा सकसपणे व तळागाळातल्या शेवटाच्या मानसापर्यंत सत्याशी निगडित असलेला आणि जशास तसा उघड्या डोळ्याने लिहिणे महत्वाचे ठरते.नव्हे कि,अमक्या-अमक्यास केंद्रबिंदू मानून त्याच्या कारकिर्दीतच ह्या इतिहास घडला.त्यास आपण कुठेतरी आपल्या व्यक्तिय, वर्गीय,आणि परंपरावादी धारणेला उराशी बाळगून इतिहासाचे एक्वटीकरण तर करत नाहीयेत ना...? असा प्रश्न इतिहास लेखकारास पडणे वास्तव इतिहासाची सत्य स्वरूप काळाची गरज आहे. कारण आपल्याकडील इतिहास आपण डोळे झाकून स्वीकारतो.आणि मग कुणीतरी त्या अंधाधुंदपणे स्वीकारलेल्या इतिहासाच्या विरोधात बोलायला लागतो.कदाचित त्याला त्या इतिगासाच्या मर्यादा सापडल्या असाव्यात.आणि मग ते विचार जनमानसात पोचले जातात .माणूस आपल्या धारणा जपून ठेवण्यासाठी रत्यास उतरतो.आणि मग होते मागणी-"हा इतिहास बदलला पाहिजे..!"
आज आपण असे इतिहासाचे विकृतीकरण झालेले उघड्या डोळ्याने बघतोच.त्या विकृतीकरनाच्या विरोधातही आंदोलने झालीत हेही आपण अनुभवून आहोत.आपल्या भारताची हि शोकांतिका आहे.हे दुर्दैवाने म्हणावे लागते.हि इतिहास लेखनाची दुर्दैवी गोष्ट आहे की आपल्याला खरे इतिहास लेखन करा हि प्रबोधनाची आरोळी ठोकवी लागते.

Comments

Popular posts from this blog