निष्टा आणि तत्व....

निष्ठतेची भीती ही अंधळ्यासारखी विश्वासाच्या अंधारात आणि अधांतरात धुस्फुस्त राहते.मित्राने गळा कापला की, मनरणप्रय दुःख होते.भागीदाराने फसविले तर व्यवहार म्हणून माणूस सतत विवंचनेच्या संकटातून सोडवणूक करून घेतो.श्वासाचा भरवसा राहिला नही इथे काळजांचा भरवसा काय???
आणि भरवश्याची अपेक्षा करण्याचा अधिकार तरी आपल्याला काय उरला आहे? जिथे स्वतःची जिवंत असण्याची उर्मीयुक्त विश्वासूठेव मागे राहत नाही तिथे आठवांचा सोस किती काळ उरणार.उद्याचा दिवस उलटला की पर्वा उरणार नसते.काळाचं पर्व सुरूच असतं.दोघांचीही सुटका.दिवस रात्र फेरा.चार आठ पंधरादी आठ्वण होईल.मन मलूल होईल.जखजखलेल्या जीवासारखं खंगुण जाईल.

काचेवर पडल्या पाण्यासारखा विरहीशिंतोडा सुकून जाईल.पण काळ दुःखाला कुठं सोकवत बसतो.त्याच्या निशाण्यावर मोठ्ठली दुःखही घासून झिजून जातात.



Comments

Popular posts from this blog