***फोटोफोबिया***

                   एरवी फोटो नि पुतळ्यांचं काय होतंय हे वास्तव किती बुद्धिजीवींनी अनुभवलं?असा प्रश्न आहे .महापुरुष आपल्या डोसक्यावर,छातीवर वा फोटोत,भिंतीवर असले म्हणजे महापुरुषांनी सांगितल्या सर्व समाजसुधारनेच्या बाबी आपल्यात आत्मसात झाल्या हे विवेकाच्या अंगाने कितीपत योग्य ठरेल...???केवळ फोटो व महापुरुषांची पुतळे तत्सम गोष्टी करून पडद्याआड महापुरुषांची व विचारांची हेळसांड समाजात होत असते.त्याचे काय??डोसक्यावर नकोय तर डोसक्यात ,काळजात पाहिजे. आपल्या वागण्या बोलण्यातून,विचारातून नि परिवर्तन कार्यातून महापुरुषांनी सांगितल्या विचारांची खरी गरज आहे समाजाला विकास गती प्राप्त  होण्याची . वरवर चा उदोउदो करणारे सत्य समाजात भिंत उभी करू पाहतात की काय ही अशी वास्तवस्थिती समजली पाहिजे.समाजाला फोटोफोबिया रोग लागतोय  काय असं वाटायला लागलंय... असो महापुरुषांनी त्यांचे अस्तित्व हे सतविचारांनी लिहून नि कार्याने भरून ठेवलं आहे.ते अभ्यासले पाहिजे.माझ्या पोस्टमुळे कुणाची मने दुखावली असतील तर मला माफ करा.मी आपणहून खूप लहान आहे. 
क्षमस्व............
...........................................................................................

Comments

Popular posts from this blog